
आम्लता – छातीतील जळजळ – पोटफुगीवर मात करा आणि तुमच्या आवडत्या अन्नाचा आनंद घ्या.
आम्ल उलटून येणे (ॲसिड रिफ्लक्स) किंवा गॅस्ट्रीटीस कशामुळे होतो?
आपले पोट अन्न पचवण्यासाठी आम्ल स्रवते. नियमितपणे जड, मसालेदार आणि आंबट अन्न खाल्ल्याने आणि ताणामुळे पचन यंत्रणेवरील भार वाढतो आणि पाचक आम्लांच्या अति स्रवण्याला उत्प्रेरक ठरतो, त्यामुळे अशी लक्षणे निर्माण होतात-
1. आम्लांच्या अविरत हल्ल्यांमुळे दाह, जलजळीची भावना, लालसरपणा, पोटाची आणि अन्ननलिकेची झीज.
2. टोकाच्या परिस्थितीत, पोट आणि अन्ननलिकेच्या दरम्यानचा वॉल्व गळतो (जीईआरडी (गर्ड) म्हटले जाते).
3. पचनावर हळूहळू परिणाम होतो, तुम्ही खाल्लेले कोणतेही अन्न आंबते आणि आम्ल, अस्वस्थता आणि गॅस निर्माण करते.
4. घशापर्यंत तीव्र जळजळ, तोंडाच्या मुळाशी मळमळयुक्त, आंबट किंवा कडू द्रव ज्याचा परिणाम आम्ल उलटून येण्यात होतो.
5. ॲसिड अति स्रवण्यामुळे तुमच्या आतड्याच्या आतील अस्तरात आणि पोटात वेदनादायक अल्सर निर्माण होऊ शकतो.
आयुशक्तीचा नैसर्गिक दृष्टीकोन आणि रसायने नसणे का?
रासायनिक अँटासीडस् तुम्ही ती घेत असता तोपर्यंत केवळ लक्षणात्मक आराम देतात आणि त्यांचा दीर्घकालीन वापर अनेक दुष्परिणामांशी संबंधित आहे, जसे
1. अस्थिसंधिशोथ, जीवनसत्त्व ब ची कमतरता कारण, ती पाचक रसांच्या स्रवण्याला अडथळा करतात.
2. गॅस किंवा ढेकर येणे.
3. पाय, गुडघे आणि हातामध्ये सूज येणे आणि पाणी साठणे
4. बद्धकोष्ठ किंवा अतिसार
आनंदी ग्राहकांच्या यशोगाथा
२ वर्षांचा आम्ल उलटून येण्यापासून २० दिवसांत आराम मिळाला.
गेली २ वर्षे मला तीव्र आम्लता होती. मी जेव्हा झोपायचो तेव्हा भरपूर आम्ल तोंडापर्यंत येत असे आणि त्यामुळे मी झोपू शकत नव्हतो. ही २ वर्षे मी ॲलोपथीचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनतर मी यूएसमधून भारतातील मुंबई आयुशक्ती केंद्रात आलो. २० दिवसांच्या आत, मला सर्व लक्षणांपासून ६०% आराम मिळाल्याचे जाणवले. आम्ल उलटून येणे कमी झाले. संपूर्ण आराम मिळण्यासाठी मी मला केलेले सर्व मार्गदर्शन पुढे चालू ठेवीन. मोनीषा गांधी, यूएसए.
६ महिन्यांचे पथ्य आणि वनौषधींनी अर्धशिशी आणि आम्लतेपासून मुक्तता
मला अनेक वर्षे अर्धशिशी आणि आम्लतेचा त्रास होता. आयुशक्तीच्या पथ्यांचे आणि वनौषधींचे केवळ ६ महिने पालन केले, आणि मला पूर्ण आराम मिळाला! अधिक उत्साही आणि निरोगी वाटते. माझ्या पत्नीचे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलसाठीचे ॲलोपॅथिक डोस आयुशक्तीच्या उपचारांनी कमी झाले आहेत. ईश्वर
मूळ कारण नष्ट करून जुनाट आम्लता, गॅस्ट्रीटीस, अपचनापासून कायमचा आराम मिळवण्यासाठी ३ आयुशक्ती पायऱ्या.

पहिला टप्पा – काढून टाका
ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.
दुसरा टप्पा- रिस्टोर करा
शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्ये, जीवनशैलीतील बदल, आणि मर्म दाब बिंदूंच्या उपयोगामार्फत सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे बाधित झालेले अवयव दुरुस्त करा आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करा.
तिसरा टप्पा- पुनर्नवीकरण करआ
हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.
आयुशक्ती तज्ज्ञ डॉक्टरांनी नियोजन केल्याप्रमाणे आयुशक्तीच्या “ॲसिडोटॉक्स” उपचारामार्फत तुम्हाला कोणते लाभ मिळतात?
1. वारंवार छातीत जळजळ आणि आम्ल उलटून येणे, पोटफुगी यात लक्षणीय आणि वेगाने घट.
2. गॅस, वायुमुक्ती, पोटदुखी, तोंडातील अल्सर, मळमळ किंवा डोकेदुखी नाही.
3. . मजबूत पाचकता, गटचे आरोग्य निर्माण करते आणि बद्धकोष्ठापासून आराम देते.
4. दाहापासून आराम देते, लाल झीज परिणामकारकपणे आणि अल्सर्स बरे करते आणि परिणामी जुनाट अस्वस्थता, वेदना आणि पोटफुगीपापासून कायमचा आराम देते.
5. तुमची पचनाशी आणि पायलोरी संसर्गाशी सामना करण्याची क्षमता वाढवते.
6. शेवटी, तुमचे पोषक घटकांचे शोषण सुधारते आणि जुनाट थकव्यापासून दीर्घकालीन आराम देते.
7. कोणत्याही वेदनाशामकांवर अवलंबित्व नाही आणि कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी ॲलोपॅथिक औषधांच्या जोडीने वनौषधी पूरके घेऊ शकतो का?
होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.
माझे आरोग्य सुधारण्याची कोणतीही हमी आहे का?
आम्ही १०८ देशांतील लोकांना ३४ वर्षे मदत करत आहोत, आणि आमच्या डॉक्टर्सनी ४.५ मिलीयन सल्लामसलती केल्या आहेत, ज्याद्वारे ३०० वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे असलेल्या लोकांना मदत केली आहे. आम्ही समस्येच्या मूळ कारणावर काम करतो, आणि ९०% लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत परिणामकारक परिणाम मिळतात.
मला माझ्या लक्षणांतून आराम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?
आमच्याकडील नोंदी आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, आमच्या प्रोग्रामचे पालन केल्यावर बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांपासून १५ दिवस ते २ महिन्यांच्या आत दिलासा मिळतो.
ही उपचार योजना सुरक्षित आहे का?
आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.
ज्या लोकांना जुनाट लक्षणांपासून दिलासा मिळाला आहे त्यांची अभ्यास प्रकरणे तुमच्याकडे आहेत का?
होय, आमच्याकडे जुनाट लक्षणांपासून लक्षणीय आराम मिळालेल्या आनंदी ग्राहकांच्या हजारो कहाण्या आहेत. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.
डॉक्टर्स व्यक्तीगत भेटींशिवाय दूरध्वनीवरून सल्लामसलत कशी करतात आणि ग्राहकांना कसे समजून घेतात?
आमच्या डॉक्टरांनी १००,००० पेक्षा जास्त दूरध्वनी आणि व्हिडीओमार्गे सल्लामसलती केल्या आहेत. ते कोणत्याही आरोग्याच्या समस्येचे समोरासमोर किंवा व्हिडीओ मार्फत विश्लेषण करण्यातील तज्ज्ञ आहेत. ते अहवाल सुद्धा तपासतात आणि लक्षणांच्या सविस्तर इतिहासाचे मूल्यमापन करतात. एकदा प्राचीन दृष्टीकोनातून त्यांनी मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही पूर्णपणे बरे होण्यासाठी ते ६ प्रोप्रायटरी साधनांचा वापर करून ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.
वनौषधी उपचार महाग आहेत का?
आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. आम्ही औषधांची उत्पादन केलेली प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी अत्यंत अत्याधुनिक यंत्रांवर त्यांची चाचणी करतो. त्याव्यतिरिक्त, आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रत्येक बॅचची अवजड धातू, कीटकनाशके आणि सूक्ष्मजंतूंची संख्या यासाठी चाचणी करतो. आमच्या बॅचेसवर दर्जासाठी युरोपियन प्रयोगशाळेद्वारे नियंत्रण आहे त्यामुळे त्या महाग पण परिणामकारक आणि सुरक्षित आहेत. त्याशिवाय, आमच्या प्राचीन सिद्ध उपचार प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर ॲलोपॅथिक औषधांची गरज असणे थांबवायला आणि शस्त्रक्रियांना प्रतिबंध करण्यात मदत केली आहे. या खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती औषधांच्या शिवाय, आम्ही औषधे का विकत घ्यावीत?
आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममध्ये तुमच्या आजारपणाच्या मूळ कारणावर परिवर्तन करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधने समाविष्ट आहेत. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयन ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांमध्ये खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रित शक्तीने काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.
आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?
आम्ही वापरत असलेल्या पेमेंट गेटवेजपाशी उच्चतम हमीचे एसएसएल/टीएलएस प्रमाणपत्र आहे जे तुमच्या प्रदानविषयक संवेदनशील डेटामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला इंटरनेटवर प्रवेश मिळणार नाही याची खात्री करतो.
मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?
तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला दूरध्वनीवरून तंत्रज्ञान वापररण्यास आणि तुमच्या स्वतःच्या बँक खात्याचा तपशील किंवा जे तुम्हाला अधिक सोपे असेल ते वापरून सहजपणे पेमेंट करण्यात मदत करेल. व्यक्तीगत मदतीसाठी टोल-फ्री क्रमांकावर (१८०० २६६ ३००१९ (भारत)/१८०० २८००९०६ (जागतिक) वर कॉल करा किंवा आम्हाला +९१ ७७७७००१५६१ वर व्हॉटसअप करा.
व्यक्तीगत सल्लामसलतीसाठी, मी माझ्याबरोबर कोणतेही पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणावेत का?
पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.
ॲसिडोटॉक्स उपचार काय आहे?
“ॲसिडोटॉक्स” उपचारात वनौषधी उपायांनी पथ्यांची योजना कमी करणारी विशिष्ट आमा (विषे) व पित्त (उष्णता) एकत्रित आहेत आणि निर्विष (विषहरण) उपचार आहेत. ॲसिडोटॉक्समधील विषहरण प्रक्रिया खोलवर रुजलेले पित्त आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. वनौषधी उपाय आणि आयुशक्ती वनौषधी -पित्तशामक, सारखी पुढील कायाकल्प प्रक्रिया अन्ननलिकेच्या अस्तरातील दाहापासून आराम मिळवण्यात मदत करते. अशा प्रकारे दीर्घकाळासाठी पोटातील आम्लता, लालसरपणा आणि अस्वस्थता परिणामकारकपणे कमी करते. परिणामस्वरुप, तुम्हाला छातीतील जळजळ, गॅस, पोटदुखी,. तोंडातील अल्सर्स यापासून लक्षणीय आरामाचा अनुभव येईल.
मला जेव्हा आम्लता येते तेव्हा घशात तीव्र वेदना असते. आयुशक्ती औषधे यापासून आराम मिळण्यासाठी परिणामकारक आहेत का?
घशातील वेदना तीव्र आम्ल उलटून येण्यामुळे आहे. आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले ॲसिड रिफ्लक्सचे मूळ कारण परिणामकारकपणे दुरुस्त करतात; अशा प्रकारे जुनाट गॅस, पोटफुगी, आणि वायुमुक्ती दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे, तुम्हाला आम्ल उलटून येण्यापासून लक्षणीय आराम मिळतो आण् त्यामुळे घशातील वेदनेपासून सुद्धा.
गेले काही महिने मला पोटातील अल्सर आहे. ॲसिडोटॉक्स उपचार अल्सरपासून आराम मिळण्यात मदत करतात का?
हो. ३ आठवड्यांसाठी ॲसिडोटॉक्स उपचार दाह, लाल झीज, वायुमुक्ती आणि पोटातील अल्सर दीर्घकाळासाठी लक्षणीयरित्या कमी करतात.
ॲसिडोटॉक्स उपचारांनंतर, मला पूर्वीसारखे, सामान्य मसालेदार, तेलकट अन्न खाता येईल का?
आम्लतेच्या आयुर्वेदिक उपचार प्रोग्रॅमनंतर, आयुशक्ती डॉक्टर तुम्हाला आम्लता, छातीतील जळजळ किंवा पोटफुगीपासून कायमच्या आरामासाठी आणखी काही महिने गुल्कासिड औषध आणि पित्तशामक समाविष्ट असलेले प्रभावी वनौषधी उपाय सुरू ठोवण्यास सांगू शकतील. या कालावधीत तुम्ही कोणतेही मसालेदार किंवा तेलकट अन्न खाल्ले तरीही तुम्हाला आम्लता होणार नाही. पण अधिक सखोल आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या परिणामांसाठी होता होईल तो असे अन्न टाळणे अधिक चांगले.
मी हा उपचार किती काळ घ्यावा?
तुम्ही वनौषधी उपाय आणि वनौषधी फॉर्म्युले घेणे ३-६ महिने सुरू ठेवू शकता आणि आम्लतेच्या किरकोळ समस्यांसाठी उत्तम परिणाम मिळवू शकता. जुनाट आम्ल उलटून येण्याच्या स्थितीत, लक्षणीय सुधारणा होण्यासाठी ९ महिने ते एक वर्ष लागेल. ॲसिडोटॉक्स निर्विष औषधोपचार जुनाट स्थितींमध्ये ३-५ आठवड्यांत चांगले परिणाम देऊ शकतील. तुम्ही तुमच्या गरजांसाठी सुटसुटीत केलेल्या ॲसिडोटॉक्स प्रोग्रॅमसाठी तुमच्या आयुशक्ती तज्ज्ञ डॉक्टरशी सल्लामसलत करू शकता.
आम्लतेमुळे श्वासाला दुर्गंधी येते का? श्वासाची दुर्गंधी कशी थांबवावी?
हो. जुनाट आम्लता असलेल्या लोकांमध्ये पोटाच्या आतील प्रक्रिया न केलेल्या अन्नाच्या कुजण्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते. ते अधिकाधिक आम्लता, अपचन आणि फुगलेले पोट, ग्रॅस, वायुमुक्ती वगैरे निर्माण करतात. श्वासाच्या दुर्गंधीच्या मूळ कारणावर एकदा उपचार केला की, इतर सर्व लक्षणे नैसर्गिकरित्या दूर होतात.
आम्लता आणि श्वासावरोध यांचा परस्पर संबंध आहे का?
अनेक लोकांना आम्लतेच्या तीव्र स्थितीत, श्वसनाला अडथळा होतो. छातीतील तीव्र जळजळ छाती भरून येणे आणि श्वासावरोधाला कारण होऊ शकते. उपचार केले नाहीत तर, त्यामुळे अस्थमा किंवा वारंवार ॲलर्जी होऊ शकते. एकदा तुमच्या आम्लतेवर मुळातून उपचार झाले की तुम्हाला श्वासावरोधापासून सुद्धा आराम मिळेल.